वादळी वाऱ्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे सुरू : आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सूचना

यावल न्युज : 
यावल तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिकांबरोबरच झाडे, शेतीपंप, शेड्स आणि इतर शेतमालाचेही नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर रावेर- यावल मतदार संघाचे आमदार अमोल जावळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या निर्देशानुसार यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

शासन स्तरावरून मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी पंचनामे अत्यंत आवश्यक असल्याने, संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची पथके तातडीने कामाला लागली आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी यंत्रणा सज्ज असून लवकरच नुकसान भरपाईसंदर्भातील अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे आमदार जावळे यांच्या कडून सांगण्यात आले.

शेतकऱ्यांनी धीर न सोडता तहसील कार्यालयाशी संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडूनही तातडीने योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आमदार अमोल जावळे यांनी सांगितले


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने